!
सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धा झाली... निकाल लागला. यानंतर गव्हाणकुंड इथल्या जलक्रांतीकारकांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला. पाऊस पडून गेल्यानंतर त्यांनी आपल्या गावातून शिवारफेरी काढली. आणि तसेच या टीमने वरुड तालुक्यातील पोरगव्हाण, करजगाव, लोणी, अमडापूर या गावांमध्येही त्या त्या गावांच्या लोकांबरोबर शिवारफेरी केली.
या शिवारफेरीत ग्रामस्थांनी तयार केलेले पाणलोटाचे विविध स्ट्रक्चर हे गुणवत्तापूर्ण आहेत का आणि पावसाचा त्यावर काय परिणाम झाला, यासारख्या गोष्टींचा अभ्यास या टीमने केला. यामुळे भविष्यात वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीत कसे काम करता येईल याची कल्पना गावकऱ्यांना आली.
या शिवारफेरीविषयी पानी फाउंडेशनचे टेक्निकल ट्रेनर सुमीत गोरले सांगतात की, " वरुड तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. घरी आलेल्या पाहुण्याचे स्वागत आणि त्याचा मुक्काम कसा झाला यासाठी आम्ही एक अभ्यास दौरा काढला. या दौऱ्यामुळे आम्हाला आमच्या कडून झालेल्या चुका लक्षात आल्या तसेच आम्हाला हेही समजले की, निसर्गच आपला गुरु आहे आणि तोच आपल्याला घडवत असतो."
-----
पानी फाउंडेशनशी कनेक्ट व्हा!
- www.facebook.com/paanifoundation | www.facebook.com/satyamevjayate
- www.paanifoundation.in/mr
- www.youtube.com/c/paanifoundation
- www.twitter.com/satyamevjayate
No comments:
Post a Comment